भारत सरकारने स्टॅण्ड अप इंडिया सुरू करण्याचा मागचा उद्देश म्हणजे या योजनेच्या माध्यमातून नवनवीन उद्योग व्यवसाय सुरू होतील, किंवा सध्या जे कार्यरत आहेत त्यांना आपले उद्योग व्यवसाय वाढवता येतील. तसेच या उद्योग व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल, ज्याचा देशातील कोट्यावधी लोकांना फायदा होईल.
प्राप्त माहितीनुसार स्टॅण्ड अप इंडिया योजनेच्या माध्यमातून 2016 पासून आतापर्यंत 1,91,696 लोकांना कर्ज मंजूर करण्यात आले असून त्यांना 43,186 कोटी रूपयांचे कर्ज देण्यात आले आहे. सदरील योजनेचा कालावधी संपत असतांना आता त्याला 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
या योजने अंतर्गत देशातील महिलांना तसेच अनुसूचित जाती व जमाती व्यक्तींना कर्ज देण्यात येते. सदरील कर्ज हे 10 लाख ते 1 कोटी पर्यंत देण्यात येते. अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे, कर्जाची परतफेड ही 7 वर्षात करावी लागेल. योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जवळच्या बँक शाखेशी संपर्क करावा लागेल. किंवा अधिक माहितीसाठी standupmitra.in या वेबसाईटला भेट द्यावी.
सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.